Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

केवळ या एका कामाने आरोग्य, नोकरीपासून लग्नापर्यंत सर्व स्वप्ने पूर्ण होतील

केवळ या एका कामाने आरोग्य, नोकरीपासून लग्नापर्यंत सर्व स्वप्ने पूर्ण होतील
साधारणपणे बहुतेक लोक सकाळी उठून सूर्यदेवाला जल अर्पण करतात. सूर्यदेवाला दररोज जल अर्पण करण्याचे विशेष महत्त्वही शास्त्रात सांगितले आहे. मान्यतेनुसार सूर्यदेवाला नियमित अर्घ्य दिल्याने समाजात मान-सन्मान वाढतो आणि खूप प्रगती होते. तसेच कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागत नाही. कुंडलीत सूर्याची स्थिती चांगली नसेल किंवा एखाद्याला रोज अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असेल तर रोज सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करावे, असे म्हटले जाते. कारण सूर्याला जल अर्पण केल्याने अनेक फायदे होतात. पण त्यांना पाणी अर्पण करण्यापूर्वी तुम्ही अनेक गोष्टी लक्षात ठेवाव्यात. चला तर मग जाणून घेऊया सूर्यदेवाला जल अर्पण करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
 
सूर्यदेवाला जल अर्पण करण्याची योग्य पद्दत
वास्तूनुसार सूर्यदेवाला जल अर्पण करण्यासाठी नेहमी फक्त तांब्याचे भांडे वापरावे.
सूर्योदयाच्या वेळी नेहमी पाणी अर्पण करावे याची विशेष काळजी घ्यावी. कारण यावेळी जल अर्पण करणे खूप फायदेशीर मानले जाते.
सूर्याला पाणी देताना आपले मुख पूर्वेकडे ठेवावे.
सूर्यदेवाला जल अर्पण करण्यापूर्वी भांड्यात अक्षत, रोळी, फुले इत्यादी ठेवा. त्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे.
सूर्याला जल अर्पण करताना 'ओम आदित्य नमः मंत्र किंवा ओम घृणी सूर्याय नमः' या मंत्राचा जप करावा.
सूर्यदेवाला जल अर्पण केल्यानंतर जमिनीवर पडणारे पाणी घेऊन कपाळाला लावावे. असे केल्याने सूर्यदेव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतात असे म्हटले जाते.
जर तुमचा सूर्य कमजोर असेल तर सूर्यदेवाला नियमित जल अर्पण करा. असे केल्याने तुम्हाला खूप फायदा होईल.
सूर्यदेवाला लाल फुले अर्पण करणे देखील शुभ मानले जाते.
 
सूर्य देव मंत्र
ॐ घृणिं सूर्य्य: आदित्य:
ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्रकिरणराय मनोवांछित फलम् देहि देहि स्वाहा
ॐ ऐहि सूर्य सहस्त्रांशों तेजो राशे जगत्पते, अनुकंपयेमां भक्त्या, गृहाणार्घय दिवाकर:
ॐ ह्रीं घृणिः सूर्य आदित्यः क्लीं ॐ 
ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय नमः 
ॐ सूर्याय नम: 
ॐ घृणि सूर्याय नम: 
ॐ भास्कराय नमः 
ॐ अर्काय नमः 
ॐ सवित्रे नमः

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

7 वेळा हनुमान चालीसा वाचल्याने कामातील अडथळे दूर होतील, जाणून घ्या कधी आणि कसे वाचावे