Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

झारखंड मध्ये पाकिस्तान आणि राहुल गांधींवर काय बोलले पीएम मोदी?

modi
, शनिवार, 4 मे 2024 (15:20 IST)
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी झारखंड मधील पलामू मध्ये म्हणाले की, पहिले काँग्रेसची घाबरट सरकार जगासमोर जाऊन रडते. आज पाकिस्तान जगात जाऊन जाऊन रडत आहे. त्यांच्या राजकुमाराला पीएम बनवण्यासाठी प्रार्थना करित आहे. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, एक ती स्थिती होती जेव्हा आतंकवादींच्या हल्ल्यानंतर काँग्रेसची घाबरट सरकार जगभर जाऊन रडत होती. ती वेळ निघून गेली आता जेव्हा जगभर जाऊन रडत होतो. आज परिस्थिती ही आहे की पाकिस्तान जगभर जाऊन 'वाचवा-वाचवा' ओरडत आहे. आज पाकिस्तानचे नेता या काँग्रेसच्या नेत्याला पंतप्रधान बनण्यासाठी प्रार्थना करीत आहे. पण आता मजबूत भारतला मजबूत सरकारच हवी आहे. 
 
तसेच ते म्हणाले की, काँग्रेसचा राजकुमार मोदींच्या अश्रूंमध्ये आनंद शोधत आहे. म्हणतात की मोदींचे अश्रू चांगले वाटतात. हे निराश-हतबल लोक आता कुंठित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तुमच्या एका या मताच्या ताकदीने आज भारताचा पूर्ण जगात डंका वाजत आहे. 500 वर्षांपासून आपल्या किती तरी पिढ्या संघर्ष करीत राहिली आहे, वाट पाहत राहिली आहे, लाखो लोक शाहिद झाले, 500 वर्ष संघर्ष चालला. कदाचित इतिहासामध्ये एवढा लांब संघर्ष कुठेच झाला नसेल. जो अयोध्येमध्ये झाला. 500 वर्षांपासून जे काम झाले नाही. तुमच्या एका मताने ते कार्य पूर्ण केले आणि आज अयोध्येमध्ये राममंदिर तयार झाले. 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, तुम्ही सर्व तुमच्या एका मताचे महत्व जाणतात. 2014 मध्ये तुमच्या एका मताने असे काम केले पूर्ण जग भारताच्या लोकतंत्र ताकदीला सलाम करायला लागली. तुम्ही 2014 मध्ये आपल्या एका मताने काँग्रेसच्या महाभ्रष्ट सरकारला काढून टाकले. तुमच्या एका मताने भाजप-एनडीएची सरकार बनली. 

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बालविवाहावर महाराष्ट्र सरकारची कारवाई, आतापर्यंत 75 प्रकरणे थांबली