Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

महिलांनी पाळीच्या काळात पाळावयाचे काही नियम

महिलांनी पाळीच्या काळात पाळावयाचे काही नियम
१) पाळी आल्यावर स्त्रियांनी ३ दिवस पूर्ण ब्रम्हचर्य पाळावे.
२) चांगल्या गोष्टीविषयी चिंतन करावे, प्रसन्न रहावे.
३) पूर्ण स्वच्छता ठेवावी.
४) शक्यतो चटईवर / सतरंजीवर झोपावे.
 
आहाराचे नियम
१) आहारात शक्यतो भाकरी, फुलका, मुगडाळ, फळभाज्या खाणे.
२) गरजेप्रमाणे मध, साखर व गुळ हे गोड पदार्थ घेणे.
३) गाईचे दुध, तुप व ताक चालेल.
४) मसाले पदार्थात वेलची, शुंठी, काळे मिरे, हिंग, सैंधव घ्यावे.
 
आहारात टाळण्याचे पदार्थ
१) हरभरा डाळीचे पदार्थ, ब्रेड, फास्टफुड, पाव इ. आंबवलेले पदार्थ खाऊ नये.
२) मसूर, हरभरा, कडधान्य, वांगे, बटाटे, बडीशेप, काळे मीठ घेऊ नये.
३) म्हशीचे दुध, दही, तुप, खाऊ नये, खीर खाऊ नये. 
 
कसे वागावे?
१) अंगाला तेल लावणे, दिवसा झोपणे, जागरण पूर्णपणे टाळावे.
२) जास्त श्रम करणे टाळावे. शारीरिक व मानसिक पूर्ण विश्रांती घ्यावी.
३) पाळीच्या काळात आहार व वर्तणूक योग्य नसल्यास त्याचा स्त्रियांच्या शरीरावर अतिरिक्त ताण पडण्याची शक्यता असते. चिडचिडपणा, उदासिनता, चिंता, ताण या प्रकारचे त्रास होऊ लागतात. त्यामुळे स्वतःच्या उत्तम आरोग्यासाठी तरी या नियमांचा विचार करावा. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पावसाळ्यासाठी केसवर्धक तेल