Publish Date: Wed, 06 Nov 2019 (10:07 IST)
Updated Date: Wed, 06 Nov 2019 (10:08 IST)
अयोध्येतील बाबरी मशिदीवरून हिंदू आणि मुस्लीम समुदायामध्ये शतकाहूनही अधिक काळ वाद सुरू आहे.
मशीद असलेलं ठिकाण म्हणजे रामाचं जन्मस्थान असल्याची हिंदुंची धारणा आहे. 16 व्या शतकात मुस्लीम आक्रमणकर्त्यांनी हिंदू मंदिर उद्ध्वस्त करून मशीद उभारली, असं ते मानतात.
मुस्लिमांचं म्हणणं आहे, की डिसेंबर 1949 पासून ते इथं प्रार्थना करत आहेत. मशिदीच्या अंधारात काही लोकांनी राममूर्ती आश्रयाला ठेवली. यानंतर येथे रामाची पूजा सुरू झाली.
चार दशकांपूर्वी हिंदू आणि मुस्लीम गटांनी या ठिकाणी प्रार्थना करण्यासाठी आणि या जागेवर नियंत्रण प्राप्त करण्यासाठी कोर्टात धाव घेतली होती.
1992 मध्ये जेव्हा हिंदू जमावाने मशीद उद्ध्वस्त केली आणि त्यानंतर देशभरात झालेल्या धार्मिक दंगलीत सुमारे 2 हजार लोक ठार झाले.
2010 मध्ये अलाहाबाद हायकोर्टाच्या तीन न्यायाधीशांच्या पीठातील दोन हिंदू न्यायाधीशांनी म्हटलं होतं, की भारतात मुघल राजवटीची स्थापना करणाऱ्या बाबर यांनी बांधलेली इमारत मशीद नाही, कारण ती पाडलेल्या हिंदू मंदिराच्या जागेवर इस्लामच्या तत्त्वांविरोधात बांधण्यात आली होती.
या केसमधील मुस्लीम न्यायमूर्ती मात्र या मतावर समाधानी नव्हते. कोणतेही मंदीर पाडले गेले नाही आणि कुठल्याही अवशेषांवर मशीद बांधली गेली नाही, असं मत त्यांनी मांडले होते.