Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

EVM गेले तर भाजपही जाणार - राज ठाकरे

EVM गेले तर भाजपही जाणार - राज ठाकरे
, मंगळवार, 6 ऑगस्ट 2019 (08:50 IST)
ईव्हीएम गेलं तर भाजपही जाईल असं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. ईव्हीएमविरोधात राज्यासह देशभरातील विरोधी पक्षांचे नेते एकवटले आहे.
 
मतपत्रिकेद्वारे मतदान घेतलं नाही तर देशातील लोकशाही धोक्यात येईल असंही ते म्हणाले.
 
अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलिया आपल्यापेक्षा कितीतरी पटींनी विकसित आहेत. ते अजूनही मतपत्रिकेचा वापर करतात. जर ईव्हीएम निर्दोष असतील तरी ते देश मतपत्रिकेचा वापर का करतात? असा सवाल राज यांनी केला.
 
याच मुद्द्यावर विरोधी पक्षाच्या नेत्यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेतली होती. आगामी विधानसभा निवडणुका मतपत्रिकेद्वारे घेण्यात याव्यात अशी मागणी त्यांनी केली होती. या मुद्यावर जनजागृतीसाठी राज्यभरात रॅली काढण्यात येणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कलम 370 रद्द करण्याचा नरेंद्र मोदी सरकारचा निर्णय कायद्याच्या कसोटीवर टिकणार का?