Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 6 March 2025
webdunia

अनुराग ठाकूर यांच्या सभेतील 'गोली मारो…' घोषणेवरून वाद

अनुराग ठाकूर यांच्या सभेतील 'गोली मारो…' घोषणेवरून वाद
, मंगळवार, 28 जानेवारी 2020 (10:46 IST)
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान केंद्रीय अर्थ राज्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून चांगलाच वाद निर्माण झाला आहे.
 
अनुराग ठाकूर यांचा एक व्हीडिओ सध्या व्हायरल होत आहे. दिल्लीतील रिठाला इथं आयोजित केलेल्या एका सभेमध्ये त्यांनी व्यासपीठावरून घोषणा दिली, "देश के गद्दारों को..."
 
त्यांच्या या घोषणेला जमावातून उत्तर आलं, "गोली मारो **** को."
 
त्यावर अनुराग ठाकूर यांनी पुन्हा म्हटलं, की आवाज अगदी पाठीमागेही पोहोचला पाहिजे. गिरीराजजींना सुद्धा ऐकू आलं पाहिजे."
 
सोशल मीडियावर ही क्लिप व्हायरल झाल्यानंतर अनुराग ठाकूर यांच्या प्रचारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. बीबीसी हिंदीनं ही बातमी दिली आहे.
 
टेलिव्हिजन क्वीज शो होस्ट सिद्धार्थ बसू यांनी अनुराग ठाकूर यांच्या या विधानावर आक्षेप घेताना म्हटलं आहे, की विरोध करणाऱ्यांना मारण्यासाठी प्रवृत्त करणारी ही कृती नाही का? मी या गोष्टीचा तीव्र निषेध करतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राज्यात कोरोना विषाणूचे चार संशयीत रुग्ण