Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'शिवसेनेला बदनाम करण्यासाठी संभाजीराजांच्या विषयाचं घाणेरडं राजकारण' - सामना

sanjay raut shivsena
, सोमवार, 30 मे 2022 (09:26 IST)
शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा भारतीय जनता पक्षावर टीका केली आहे. "तुम्ही शब्द पाळला नाही म्हणून महाराष्ट्रातील जनतेला उत्तम सरकार मिळालं. त्यामुळे तुमचे आभार. यापुढे महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची सत्ता कधीच येणार नाही,"असं वक्तव्य त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातल्या कागलमध्ये केलं. 
 
"आम्ही म्हणे संभाजीराजेंना फसवले. हे कोण म्हणतंय. तर भाजप. फसवाफसवीची भाषा करणारे आम्हाला म्हणत आहेत की आम्ही फसवलं," असे ते म्हणाले.
 
सामनाच्या अग्रलेखातही याचा विषयाचा उल्लेख आहे. त्यात लिहिलं आहे की शिवसेनेना बदनाम करण्यासाठी संभाजीराजांच्या विषयाला फोडणी देण्याचा घाणेरडं राजकारण सुरू आहे.
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी शब्द फिरवला असं वाटत नाही, हे सर्व भाजपचेच राजकारण असंही अग्रलेखात लिहिलं आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सिद्धू मुसेवालांच्या वाहनावर झाले तीस राऊंड फायर, पंजाब पोलिसांची माहिती