Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वीजं बिलं वाढलेली नाहीत, लोकांचा तसा समज झालाय-नितीन राऊत

वीजं बिलं वाढलेली नाहीत, लोकांचा तसा समज झालाय-नितीन राऊत
, बुधवार, 12 ऑगस्ट 2020 (12:19 IST)
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊन काळानंतर महावितरण आणि इतरही काही वीज पुरवठा करणाऱ्या कंपन्यांकडून ग्राहकांना भरमसाट वीज बिलं देण्यात आली. यासंदर्भात सध्या बरीच नाराजी दिसून येत आहे. पण, वीज बिलांची तपासणी केल्यास मुळात वीज बिलांच्या देय रकमेचा आकडा वाढवलेला नाही, असं मत खुद्द राज्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांनी मांडलं आहे.

वीज बिलं वाढल्याचा समज असला तरीही मुळात मात्र ती वाढलेली नाहीत, याच मतावर ते ठाम दिसले.
ग्राहकांची अवाजवी वीज बिलं माफ करावी अशी मनसेची मागणी आहे, त्यांनी केंद्र सरकाकडे ही मागणी करावी, असं त्यांनी थेट शब्दांत सांगितलं. आमच्यावर लावला जाणारा आक्षेप चुकीचा असल्याचं म्हणत घरगुती ग्राहकांची आर्थिक स्थिती नाजूक आहे, त्यामुळे त्यांना दिलासा देण्याचा आमचा प्रयत्न असल्याची बाब राऊत यांनी अधोरेखित केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सरकारचा मोठा निर्णय : वैष्णो देवी यात्रा १६ ऑगस्टपासून सुरू