Publish Date: Thu, 14 Nov 2019 (11:26 IST)
Updated Date: Thu, 14 Nov 2019 (11:29 IST)
राष्ट्रवादीचे 9 आमदार भाजपच्या संपर्कात आहेत, असं वक्तव्य माढ्याचे भाजप खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केलं आहे.
"काँग्रेस आणि शिवसेनेनं आपल्या आमदारांनी पक्षांतर करू नये म्हणून काळजी घेतली आहे. त्यामुळे सत्तास्थापनेचा घोडेबाजार होणार याची त्यांना भीती आहे. मात्र राष्ट्रवादीचे 9 आमदार आपल्या संपर्कात आहे," असं वक्तव्य निंबाळकर यांनी केलं आहे.
अवकाळी पावसानं नुकसान झालेल्या पिकांची पाहणी निंबाळकर माढ्यात आले होते. यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय घडामोडीबाबत हे विधान केलं.
webdunia
Publish Date: Thu, 14 Nov 2019 (11:26 IST)
Updated Date: Thu, 14 Nov 2019 (11:29 IST)