Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रोहित पवार : राज्याच्या हितासाठी बोलण्याची वेळ येते तेव्हा भाजप नेते कुठे लपतात?

रोहित पवार : राज्याच्या हितासाठी बोलण्याची वेळ येते तेव्हा भाजप नेते कुठे लपतात?
, गुरूवार, 24 सप्टेंबर 2020 (15:44 IST)
"राज्य आर्थिक संकटात असताना आपल्या हक्कांच्या पैशांसाठी केंद्र सरकारसोबत भांडायची वेळ येते तेव्हा विरोधक राज्य सरकारची साथ देणे तर सोडून द्या पण कुठे जाऊन लपतात हेही कळत नाही," या शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भाजपवर टीका केली आहे.  
 
महाराष्ट्राला जीएसटीची नुकसान भरपाई येणं प्रलंबित आहे. जीएसटी कायद्याच्या अंमलबजावणीनंतर राज्याचं महसूली उत्पन्न घटल्यास पाच वर्षांसाठी नुकसान भरपाई देण्यात येईल अशी तरतूद आहे.
 
या विश्वासावरच राज्यांनी जीएसटी कायद्याला मंजूरी दिली. पण केंद्र सरकारने हा विश्वास पायदळी तुडवला, असा आरोपही रोहित पवार यांनी केलाय.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमेरिका निवडणूक 2020 : शांततेत सत्ता हस्तांतरास डोनाल्ड ट्रंप तयार नाहीत?