भारताला जोडलेला नसून भारताचाच एक भाग म्हणजे बेट अंदमान. सहलीला गेल्यावर अवश्य पाहावा असा हा द्वीपसमूह आहे. बंगालच्या उपसागरात असलेली अंदमान आणि निकोबार ही बेटे भारताच्या मुख्य भूमीपासून दूर आहेत. या बेटांना आगळ्या- वेगळ्या संस्कृतीचे आणि अनोख्या निसर्गसंपदेचे वलय लाभले आहे.
इतिहासकाळात ‘काळेपाणी’ म्हणून ओळखल्या जाणार्या अंदमानचा आनंद अवश्य घ्यायला हवा. आज भारतीयांसाठी अंदमान हे एक निसर्गरम्य र्पटनस्थळ आहे. याला राष्ट्रीय तीर्थ असेही म्हणतात. कारण या बेटांना राष्ट्रीय स्मारकाचा दर्जा लाभलेला आहे. इथला तुरूंग विशेष प्रसिद्ध आहे. या तुरूंगाची मूळ रचना अशी आहे की, याला चक्राच्या आर्याप्रमाणे सात विभाग असून त्यांच्या मध्यभागी एक उंच कॅट टॉवर आहे. हा तुरूंग तीन मजली होता. बहुसंख्य लोकांना या तुरूंगाबद्दल मोठे आकर्षण वाटत आहे. याचे मुख्य कारण म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना ठेवण्यात आले होते.