Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अखेर ब्रेकअपनंतर तनिषाने सोडले मौन

अखेर ब्रेकअपनंतर तनिषाने सोडले मौन
, रविवार, 19 ऑक्टोबर 2014 (11:58 IST)
अभिनेत्री तनिषा मुखर्जीने पहिल्यांदाच अरमान कोहलीसोबतचे प्रेमसंबंध संपुष्टात आल्यानंतर आपले मौन सोडले आहे. सोशल मीडियावरुन तनिषासोबतचे प्रेमसंबंध संपल्याचे अरमानने जाहीर केले होते. तनिषाने मात्र या विषयावर काहीही बोलण्यास नकार दिला होता. प्रथमच या विषयावर तनिषाने मौन सोडले. अरमान आणि मी भिन्न व्यक्तिमत्त्वाची माणसे आहोत. आमचे विचार वेगळे आहेत.

लग्न हा खेळ नाही. आमच्या दोघांची आयुष्य जगण्याची पध्दत वेगळी आहे. त्यामुळे आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला. मी अरमानला त्याच्या आयुष्यातील पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देते असे तनिषाने सांगितले. 
 
अभिनेत्री काजोलची बहीण आणि तनुजाची मुलगी ही तनिषाची आणखी एक ओळख. मागच्या सीझनमध्ये बिग बॉसच घरात तनिषा आणि अरमानची पहिल्यांदा भेट झाली. बिग बॉसच्या घरात एकत्र राहताना ते परस्परांच्या प्रेमात पडले. बिग बॉसच्या घरातून बाहेर आल्यानंतरही त्यांचे प्रेमसंबंध सुरु होते. दोघांनी एकत्र वैष्णवदेवीची यात्राही केली. त्याचे फोटो अरमानने टिटरवर अपलोड केले होते. दोघेही लवकरच विवाह करणार असून, त्यांनी विवाहासाठी दागिन्यांची खरेदी केल्याचीही चर्चा होती. मात्र अचानक एकदिवस अरमानने प्रेमसंबंध संपल्याचे जाहीर केले.

Share this Story:

Follow Webdunia marathi