जम्मू-काश्मीर आणि आसामातील पुरामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली. तेथील स्थानिक लोक अजूनही निसर्गाशी झगडत आहेत. त्यांच्या मदतीसाठी बॉलिवूड सेलिब्रिटींनी पुढाकार घेतला आहे. रणबीर कपूर आणि अनुष्का शर्मा यांनी आपले चित्रपटात वापरलेले कपडे दान करण्याचा निर्णय घेतला आहे. या कपड्यांचा
लिलाव करण्यात येणार असून, या लिलावातून जमा होणारे पैसे पूरग्रस्तांना देण्यात येणार आहेत.
ईबे इंडिया आणि इव्हेंट अॅण्ड एन्टरमेंट असोसिएशन यांनी एकत्र येऊन पूरग्रस्त काश्मीर आणि आसामच्या पुनर्बांधणीसाठी निदी गोळा करण्याचा निर्णय घेतला आहे.