Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हताश विराटला अनुष्काचा सहारा

हताश विराटला अनुष्काचा सहारा
, सोमवार, 17 मार्च 2014 (23:28 IST)
आशिया चषकाच्या फायनलनंतर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली अचानक श्रीलंकेला का गेला, याचा खुलासा झाला आहे. आशिया चषकात भारताच्या पराभवामुळे विराट कोहली अत्यंत तणावाखाली होता. हताश झालेल्या विराटमध्ये त्याचं करिअर संपल्याची भावना निर्माण झाली होती. हा तणाव आणि निराशा दूर करण्यासाठी विराट थेट श्रीलंकेला गेला होता. इथे अभिनेत्री अनुष्का शर्मा तिच्या ‘मुंबई वेल्वेट’चं शूटिंग करत होती. विराटने इथे अनुष्कासोबत काही वेळ घालवला आणि आपल्या भावना तिच्यासोबत शेअर केल्या. तिला भेटून आल्यानंतर विराटने 13 मार्चला ट्विट केले. 
 
’Well Rested: time to get back to the grind now!’आराम केला, आता पुन्हा खेळण्यासाठी सज्ज आहे. या आधी विराट न्यूझीलंडच्या दौर्‍यावर असताना अनुष्का त्याला भेटायला गेली होती. तसंच दोघांना एकमेकांच्या हातात हात घालून फिरताना अनेकांनी पाहिलं होतं. इतकंच नाही तर आता तर अशी चर्चा आहे की, दोघे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत आहेत त्यामुळे अनुष्काला भेटल्याचा परिणाम आता टी-20 विश्वचषकात विराट कोहलीच्या फलंदाजीत दिसतो का हे लवकरच कळेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi