Publish Date: Tue, 11 Apr 2017 (12:16 IST)
Updated Date: Tue, 11 Apr 2017 (12:18 IST)
गायक अभिजीत भट्टाचार्य यांनी कुलभूषण जाधव प्रकरणी ट्विट करुन, “सगळे खान गप्प का आहेत?” अशी विचारणा केली आहे. भारतात पाकिस्तानी नागरिक दिसल्यास त्यांना झाडाला लटकवा, असंही त्यांनी म्हटलं आहे. रॉ’चे एजंट असल्याच्या आरोपाखाली पाकिस्तानमध्ये अटकेत असलेल्या भारताच्या कुलभूषण जाधव यांना पाकिस्तानमधील रावळपिंडी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. त्याविरोधात आवाज उठवत अभिजीत यांनी हे ट्विट केलं आहे.