Publish Date: Thu, 26 Mar 2026 (08:01 IST)
Updated Date: Thu, 26 Mar 2026 (08:05 IST)
आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर २: द रिव्हेंज' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटात रणवीर सिंगसोबत अर्जुन रामपाल, संजय दत्त, आर. माधवन आणि सारा अली खान यांच्या प्रमुख भूमिका आहे. अर्जुन रामपालने चित्रपटात मेजर इक्बालची भूमिका साकारली आहे.
'धुरंधर २' च्या अनेक दृश्यांमध्ये, अर्जुन रामपालचे पात्र भारतावर टीका करताना आणि 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा देताना दिसत आहे. आता, अर्जुन रामपालने यासाठी माफी मागितली आहे. अभिनेत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.
मुंबईत नुकत्याच झालेल्या एका पुरस्कार सोहळ्यात, जेव्हा अर्जुन रामपाल आपली ट्रॉफी स्वीकारण्यासाठी मंचावर आला, तेव्हा त्याने चित्रपटातील आपली नकारात्मक भूमिका 'मेजर इक्बाल'बद्दल माफी मागितल्याने वातावरण भावूक झाले. अर्जुन म्हणतो, "जेव्हा आदित्य धरने मला तो २६/११ चा प्रसंग सांगितला, तेव्हा मला वाटलं की बदला घेण्याची हीच माझी संधी आहे. पडद्यावर ती खलनायकाची भूमिका साकारणं म्हणजे अनेक वर्षांपासून मनात साचलेला राग बाहेर काढण्यासारखं होतं."
अर्जुन म्हणतो, "मी चित्रपटात भारतासाठी इतके अपमानास्पद शब्द वापरले त्याबद्दल मला माफ करा, पण मी मनाने एक देशभक्त आहे." तो "भारत माता की जय" म्हणत आपले म्हणणे संपवतो.
या चित्रपटात अर्जुन रामपालने आयएसआयचा सूत्रधार मेजर इक्बालची भूमिका साकारली आहे. चित्रपट समीक्षक आणि प्रेक्षकांच्या मते, हे पात्र वास्तविक जीवनातील कुख्यात दहशतवादी इलियास काश्मिरीपासून प्रेरित असल्याचे म्हटले जाते. इलियास काश्मिरी, जो एकेकाळी पाकिस्तानी विशेष दलाचा भाग होता आणि नंतर एका जागतिक दहशतवादी नेटवर्कचा चेहरा बनला, त्याला २६/११ हल्ल्यांमागील प्रमुख सूत्रधारांपैकी एक मानले जात होते.
Edited By- Dhanashri Naik