Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

दादा साहेब फाळके पुण्यतिथी विशेष : चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, 15 हजार रुपयांत पहिला चित्रपट बनवला

दादा साहेब फाळके पुण्यतिथी विशेष : चित्रपट सृष्टीचे जनक दादासाहेब फाळके, 15 हजार रुपयांत पहिला चित्रपट बनवला
, बुधवार, 16 फेब्रुवारी 2022 (09:50 IST)
भारतात चित्रपटसृष्टीची निर्मिती करण्याचे सर्व श्रेय दादा साहेब फाळके यांना आहे. देशातील पहिले चित्रपट यांनी बनवले. त्यांनी आपल्या 19 वर्षाच्या कारकिर्दीत सुमारे 95 चित्रपटांची निर्मिती केली .त्यांनी पहिला चित्रपट 'राजा हरिशचंद्र' केवळ 15 हजार रुपयांत बनवला.आज त्यांची पुण्यतिथी आहे. चला त्यांच्या बद्दल जाणून घेऊ या. 
    
भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांचे खरे नाव 'धुंडीराज गोविंद फाळके' होते. त्यांचा जन्म 30 एप्रिल 1870 रोजी झाला. ते उत्तम लेखक तसेच उत्तम दिग्दर्शक होते. दादासाहेब फाळके यांना कलेची नेहमीच आवड होती. त्यांना याच क्षेत्रात करिअर करायचे होते. 1885 मध्ये त्यांनी जेजे कला महाविद्यालयात प्रवेश घेतला. कला महाविद्यालयानंतर त्यांनी पुढील शिक्षण कला भवन, वडोदरा येथे पूर्ण केले. 1890 मध्ये, दादासाहेब वडोदरा येथे गेले जेथे त्यांनी काही काळ छायाचित्रकार म्हणून काम केले. पहिली पत्नी आणि मुलाच्या मृत्यूनंतर त्यांनी ती नोकरी सोडली.
 
नंतर दादासाहेब फाळके यांनी स्वतःचा छापखाना सुरू केला. भारतीय कलाकार राजा रविवर्मा यांच्यासोबत काम केल्यानंतर ते प्रथमच भारताबाहेर  जर्मनीला गेले. तिथे त्यांनी आयुष्यात पहिल्यांदा 'द लाइफ ऑफ क्राइस्ट' हा चित्रपट पाहिला आणि नंतर त्यांनी भारतात येऊन पहिला चित्रपट करण्याचा निर्णय घेतला. पहिला चित्रपट करण्यासाठी त्यांना खूप संघर्ष करावा लागला. हा चित्रपट बनवण्यासाठी त्याला सहा महिने लागले.
 
पत्नी आणि मुलाच्या मदतीने दादासाहेबांनी पहिला चित्रपट 'राजा हरिश्चंद्र' बनवला. हा चित्रपट बनवण्यासाठी त्यांना 15 हजार रुपये लागले. आज जरी ही रक्कम कमी वाटत असली तरी त्या काळात ती खूप मोठी होती. या चित्रपटात दादासाहेबांनी स्वतः राजा हरिश्चंद्राची भूमिका केली होती. त्यांच्या पत्नीने वेशभूषेचे काम हाताळले आणि त्यांच्या मुलाने हरिश्चंद्राच्या मुलाची भूमिका केली. कोणतीही स्त्री काम करायला तयार नसल्याने दादासाहेबांच्या चित्रपटात एका पुरुषाने स्त्रीची भूमिका केली होती. हा एक कृष्णधवल आणि मूक चित्रपट होता.

भारतीय चित्रपट सृष्टीतील सर्वोत्कृष्ट सन्मानांपैकी एक सन्मान आहे दादा साहेब फाळके पुरस्कार. दरवर्षी हे एका विशेष व्यक्तीला  दिले जाते ज्यांनी या सिनेसृष्टीत महत्वाचे योगदान दिले आहे. गेल्या 5 वर्षांपासून हा पुरस्कार दक्षिण भारताचे सुपरस्टार रजनीकांत यांना मिळत आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राजकुमारने बप्पी लाहिरीची खिल्ली उडवत म्हटलं होतं, मंगळसूत्रही घातलं असतं...