rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राणी मुखर्जी यांना ब्रेक देणारे प्रसिद्ध बॉलीवुड निर्माता सलीम अख्तर यांचे निधन

Salim Akhtar Death
प्रसिद्ध निर्माते सलीम अख्तर यांचे निधन झाले. मंगळवार, 8 एप्रिल रोजी मुंबईतील कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सलीम अख्तर यांनी अभिनेत्री राणी मुखर्जीला राजा की आयेगी बारात चित्रपटातून इंडस्ट्रीत आणले.
सलीम अख्तर यांनी अनेक मोठे सुपरहिट चित्रपट निर्माण केले आहेत. ज्यामध्ये 'चोर की बारात', 'कयामत', 'लोहा', 'बटवारा', 'फूल और अंगारे', 'बाजी', 'इज्जत' आणि 'बादल' या चित्रपटांचा समावेश आहे. राणी मुखर्जी व्यतिरिक्त, सलीम खानने तमन्ना भाटियालाही ब्रेक दिला. 
सलीम अख्तर हे बऱ्याच काळापासून आजारी होते. त्यांना रुग्णालयात व्हेंटिलेटरवर ठेवले होते. सलीम जीवन आणि मृत्यूशी झुंज देत होते.अखेर आज रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. इंडस्ट्रीतील लोक त्याला त्याच्या साध्या आणि सरळ वागण्यामुळे ओळखत होते.
ALSO READ: अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची आई किम फर्नांडिस यांचे निधन
सलीम अख्तर यांनी 1980आणि 1990 च्या दशकात एक उत्कृष्ट निर्माता म्हणून काम केले. सलीम अख्तर यांनी त्यांच्या 'आफताब पिक्चर्स' या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली असे अनेक चित्रपट बनवले जे अजूनही लोकांच्या लक्षात आहेत. राणी शिवाय सलीम अख्तरने 'चंदा सा रोशन चेहरा'मध्ये तमन्ना भाटियाला इंड्रस्टी मध्ये आणले होते. 
बॉलिवूड सेलिब्रिटींपासून ते सोशल मीडिया वापरकर्त्यांपर्यंत सर्वजण त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’ हा लंडनच्या लीसेस्टर स्क्वेअरमध्ये पुतळ्याने सन्मानित होणारा पहिला भारतीय चित्रपट ठरला