Publish Date: Sat, 04 Feb 2023 (16:37 IST)
Updated Date: Sat, 04 Feb 2023 (16:40 IST)
मनोरंजन विश्वातून एक दुःखद बातमी समोर आली आहे. यंदाच्या पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ गायिका वाणी जयराम यांचे निधन झाले आहे. 77 वर्षीय गायिका चेन्नईतील त्यांच्या घरी मृतावस्थेत आढळून आले आहे. त्यांच्या निधनाची बातमी समोर आल्यानंतरच इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे.
वाणी जयराम यांच्या मृत्यूच्या तपासासाठी पोलीसही त्यांच्या घरी पोहोचले आहेत. त्याचवेळी वाणी जयरामच्या घरी काम करणाऱ्या मलारकोडीचे वक्तव्यही समोर आले आहे. मलारकोडी म्हणाली, 'मी पाच वेळा बेल वाजवली, पण त्यांनी दरवाजा उघडला नाही. माझ्या पतीनेही त्यांना फोन केला पण त्यांनी फोन उचलला नाही. या घरात त्या एकट्याच राहायच्या.
वाणी जयरामने हिंदी, तमिळ तेलगू, मल्याळम, मराठा, बंगाली अशा अनेक भाषांमध्ये 10 हजाराहून अधिक गाण्यांना आवाज दिला आहे. 'गुड्डी' (1971) या बॉलिवूड चित्रपटात त्यांनी 'बोले रे पापीहा रे' हे गाणे गायले होते. वाणी जयराम यांना तीनदा सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आहे. याशिवाय त्यांना तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ, महाराष्ट्र, गुजरात आणि ओडिशा येथून राज्य पुरस्कारही मिळाले आहेत.
Edited by : Smita Joshi