Publish Date: Sat, 06 May 2023 (09:19 IST)
Updated Date: Sat, 06 May 2023 (09:23 IST)
केरळमधून 32 हजार मुली गायब झाल्याचा आणि दहशतवादी संघटना ISIS मध्ये सामील झाल्याचा दावा सोशल मीडियावरून काढून टाकण्याबाबत द केरला स्टोरीच्या निर्मात्यांनी सहमती दर्शवली आहे.
या प्रकरणी उच्च न्यायालयात सुनावणी झाल्यानंतर चित्रपट निर्मात्यांनी हा दावा हटवण्याचं कोर्टात मान्य केलं.
विशेष म्हणजे, या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती. ती मागणी कोर्टाने फेटाळून लावली आहे. चित्रपटाचा ट्रेलर रिलीज होताच, यावरून वाद निर्माण झाला होता. मात्र, हा चित्रपट अखेर 5 मे रोजी प्रदर्शित झाला आहे. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली.