हल्ली सिनेमा थिएटरवर येण्याआधीच मोबाइलवर दिसू लागतो. तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे एकामागोमाग एक चित्रपट लीक होतायत. त्यामुळे बॉलिवूडच्या बडय़ा कलाकारांनाही धडकी भरलीय. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात याबद्दल विचारलं असता, अभिनेत्री कंगना राणावत हिने स्पष्ट शब्दात आपली नाराजी व्यक्त केली. ‘कोणताही सिनेमा बनवण्यामागे अनेकांची मेहनत असते, विचार असतात.