Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुलीच्या नावाने लिहिलेल्या पत्रात फरहान म्हणाला, असुरक्षित समाजात राहतो आम्ही

मुलीच्या नावाने लिहिलेल्या पत्रात फरहान म्हणाला, असुरक्षित समाजात राहतो आम्ही
, बुधवार, 5 ऑक्टोबर 2016 (11:55 IST)
देशात वाढत असलेले रॅप, यौन हिंसेला बघून काही दिवसांअगदोर अमिताभ बच्चन यांनी आपल्या नातींसाठी एक पत्र लिहिले होते. आता  हिंदुस्तान टाइम्सचे आठ पार्ट सीरीज 'लेट्स टॉक रेप'मध्ये फरहान अख्तरने आपल्या मुलीच्या नावाने एक पत्र लिहिले आहे, ज्यात वडील असल्याच्या नात्यामुळे त्याला कुठल्या गोष्टींची भिती वाटते.   
पत्राच्या सुरुवातीत फरहानने लिहिले, 'मी रॅप आणि यौन हिंसेबद्दल सांगून कशी या पत्राची सुरुवात करू. प्रत्येक वडील आपल्या मुलांची सुरक्षेचा इच्छुक असतो पण आम्हाला या गोष्टींवर डिस्कस करावेच लागेल. मला एका कवितेच्या माध्यमाने सुरुवात करण्याची इच्छा आहे जी 2012मध्ये माझ्या टीमच्या एका वकिलाच्या हत्येनंतर मी लिहिली होती. त्या वेळेस तू फारच लहान होती फक्त 12 वर्षांची... त्या वेळेस मला तुला फक्त हसताना बघायचे होते. रॅप आणि मर्डरची गोष्ट त्या वेळेस तुमच्यासाठी योग्य नव्हती.'
 
फरहान लिहितो, 'आता तू 16 वर्षांची आहे आणि तुझ्याही मनात बरेच प्रश्न येत असतील. तेच प्रश्न मी स्वत:ला विचारतो.' फरहानने पुढे कविता लिहिली : 
 
'What is this country that I live in? That takes away her right to love Brutalises her with an iron glove Rapes her without fear of there being justice for her tear... ...what do I tell my daughter? That she's growing up to be lamb for the slaughter we've got to make a change Reboot, reformat, rearrange, and never give in no matter how much our head may spin Just keep asking the question What is this country that I live in?' 
 
फरहानने पत्रात काही गंभीर प्रश्न विचारले आहे. जसे, 'जे मला परिधान करायचे आहे ते मी का नाही करू शकत? मी दुसर्‍यांप्रमाणे आझाद का नाही आहे?' फरहानने पुढे लिहिले, 'हो, आम्ही असुरक्षित समाजात राहतो. पण आम्ही तुम्हाला कधीही हे सांगितले नाही की तुम्हाला काय घालायला पाहिजे आणि काय नाही. तू बॉलीवूड इंडस्ट्रीबद्दल बर्‍याच वेळा बरेच काही विचारले आणि मी प्रत्येक वेळेस तुझ्या प्रश्नांचे उत्तर दिले आहे.'
 
फिल्ममेकर होण्याबद्दल आम्ही आपल्या डोळ्यावर पट्टी बांधून कसेही चित्रपट नाही बनवू शकत. आमचे ऑडियंसवर आम्ही विश्वास करतो म्हणून आम्हाला एंटरटेनमेंटच्या नावावर काहीही तयार करायचे नाही आहे.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

रहस्य उलगडणार आणि रात्रीस खेळ थांबणार