साहित्य : 20 लिंबू, दीड किलो साखर, 1/2 लहान चमचा गुलाबपाणी, 200 ग्रॅमचा टीन अननसाचा रस व तुकडे किंवा 1/2 अननस 200 ग्रॅम साखर टाकून शिजवावे. 1 चिकू, 1 सफरचंद, 2 नाशपती, 50 ग्रॅम डब्यातील चेरी, 1 अनार दाणे, 4 केळी, 1 आंबा, 1 आलूबुखारा, 20 बदाम सोलून लांब बारीक कापावे, 5 अक्रोड बारीक कापलेले, 50 ग्रॅम द्राक्ष.
कृती : एक ग्लास पाणी भारी पातेल्यात उकळण्यासाठी ठेवावे. त्यात साखर टाकून हालवावे व 10 मिनिटापर्यंत शिजवावे. एक लिंबाचा रस घालून त्यावरील साय काढून आंचेवरून खाली उतरवून ठेवावे. थंड झाल्यावर एक-एक लिंबाचा रस काढून मिसळावे. नंतर त्यात गुलाबजल टाकावे. सर्व लिंबाचा रस टाकणे झाल्यावर अननसाचा रस टाकून हालवावे. चाशनीचे मिश्रण पारदर्शी दिसायला लागेल, रंग पिवळा होईल. आता सर्व फळे बारीक कापून अनार दाण्यासोबत त्यात मिसळावे. अननसाचे तुकडे आजूबाजूला सजविण्यासाठी ठेवावे. शेवटी वरून सुकलेले मेवे टाकून बरणीत बंद करून ठेवावे. जर जास्त काळासाठी ठेवायचे असेल तर त्यात पोटेशियम मैटा बाई सल्फाइडचा अर्धा चमचा टाकावा.