Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज्यपालांनी ३० एप्रिलपर्यंत भेटी रद्द केल्या

राज्यपालांनी ३० एप्रिलपर्यंत भेटी रद्द केल्या
, बुधवार, 1 एप्रिल 2020 (07:33 IST)
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राजभवनात येणाऱ्या लोकांच्या भेटी ३० एप्रिलपर्यंत रद्द केल्या आहेत. त्यामुळे आता महिनाभर राजभवनात येऊन कुणालाही राज्यपालांची भेट घेता येणार नाही.

ज्यांनी भेटीचे आरक्षण केले आहे, त्यांना कालांतराने राजभवनाला भेट देता येईल, असे ट्विट राजभवनाच्या हँडलवरून करण्यात आले आहे. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जितेंद्र आव्हाड सोलापूरचे नवे पालकमंत्री