Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोनाची तिसरी लाट येणार आणि सप्टेंबर मध्ये अधिक तीव्र होणार -एसबीआय अहवाल

कोरोनाची तिसरी लाट येणार आणि सप्टेंबर मध्ये अधिक तीव्र होणार -एसबीआय अहवाल
, मंगळवार, 6 जुलै 2021 (10:57 IST)
ऑगस्टच्या मध्यापर्यंत कोरोना विषाणूची तिसरी लाट भारतात येण्याची  शक्यता आहे,तर सप्टेंबरमध्ये ही प्रकरणे वाढू शकतात.
 
सोमवारी एका अहवालात हा दावा केला गेला आहे.सध्या देशातील दुसरी लाट अद्याप संपलेली नाही.एसबीआय रिसर्चने प्रकाशित केलेल्या 'कोविड -19 द रेस टू फिनिशिंग लाईन' या शीर्षकातील अहवालात म्हटले आहे की, लसीकरण हा एकमेव संरक्षण असू शकतो,कारण जागतिक आकडेवारी वरून दिसून येते की सरासरी तिसरी लाटांची प्रकरणे दुसऱ्या लाटेच्या प्रकरणाच्या तुलनेत 1.7 टक्के अधिक होऊ शकतात. 
 
सध्या भारतात केवळ 4.6 टक्के लोकांवर संपूर्ण लसीकरण झाले आहे, तर 20.8 टक्के लोकांना एकच डोस मिळाला आहे हे अमेरिका (47.1 टक्के),यूके (48.7 टक्के),इस्त्राईल (59.8 टक्के),स्पेन (38.5 टक्के),फ्रान्स (31.2टक्के) इत्यादी देशांच्या तुलनेत बरेच कमी आहे.
 
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या ग्रुप चीफ इकॉनॉमिक एडव्हायझर सौम्य कांती घोष यांनी अहवालात म्हटले आहे की, 7 मे रोजी भारतात दुसर्‍या लाटेची उच्च प्रकरणे दिसली आणि सध्याच्या आकडेवारीनुसार,देशभरात सुमारे 10,000 प्रकरणे जुलै महिन्याच्या दुसर्‍या आठवड्यात नोंदविली जातील.'ते म्हणाले की,ट्रेंडनुसार, 21ऑगस्ट पासून प्रकरणे वाढू लागतील,जे किमान एक महिन्यानंतर,शिखरावर येई पर्यंत वाढतील.
 
सद्यस्थितीत गेल्या आठवड्यापासून जवळपास 45,000 प्रकरणाची नोंद होत आहेत.हे दर्शवते की देशातील विनाशकारी दुसरी लाट अद्याप संपलेली नाही.घोष म्हणाले की पहिल्या लाटेतही प्रकरणां मध्ये हळू हळू घट झाली असून दररोजच्या प्रकरणांमध्ये घट झाल्याच्या 21 दिवसांपर्यंत 45,000 प्रकरणाची नोंद झाली.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पावसाळी अधिवेशनाचा दुसरा दिवस कसा जाणार?