Publish Date: Mon, 10 Aug 2020 (08:46 IST)
Updated Date: Mon, 10 Aug 2020 (08:48 IST)
राज्यात आतापर्यंतच्या सर्वोच्च संख्येने १३ हजार ३४८ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यभरात कोरोनाचे एकूण ३ लाख ५१ हजार ७१० रुग्ण बरे झाले आहेत. रविवारी देखील नवीन निदान झालेल्या रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक असून १२ हजार २४८ नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्याचे रुग्ण बरे होणाचे प्रमाण ६८.२५ टक्के एवढे आहे. सध्या १ लाख ४५ हजार ५५८ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत. रविवारी देखील राज्यभरात सर्वाधिक ७८ हजार ७० चाचण्या करण्यात आल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
पाठविण्यात आलेल्या २७ लाख २५ हजार ०९० नमुन्यांपैकी ५ लाख १५ हजार ३३२ नमुने पॉझिटिव्ह (१८.९१ टक्के) आले आहेत. राज्यात १० लाख ५८८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३४ हजार ८५७ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात रविवारी ३९० करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.४५ टक्के एवढा आहे.