कार्तिक शुक्ल एकादशीपासून पुढे चार दिवस तुळशी विवाह लावला जातो. तुळशीला विष्णू-प्रिया असेही संबोधले जाते. तुळशी विवाहासाठी कार्तिक शुक्ल नवमी ही तिथी योग्य आहे. परंतु, काही जण एकादशीपासून पौर्णिमेपर्यंत तुळशी पूजा करतात व पाचव्या दिवशी तुळशीचा विवाह करतात. तुळशीचा विवाह देवाशी म्हणजेच श्रीकृष्णाशी लावला जातो.
तुळशी विवाह कसा करावा? * तुळशी विवाहाच्या तीन महिने आधीपासून तुळशीच्या रोपाला नियमित पाणी घालून त्याची पूजा करावी. * मुहूर्तानुसार मंत्रोच्चारण करून दाराला तोरण लावा व मंडप लावा. * चार पुरोहितांकरवी गणपती-मातृका पूजा करा. * यानंतर लक्ष्मी-नारायणाची मूर्ती व तुळशीपत्रासोबत सोने व चांदीची तुळस आसनावर ठेवा. * यजमानाने पत्नीसोबत उत्तराभिमुख आसन ग्रहण करावे.
ND
* गोरज मुहूर्तावर (वराचे) देवाचे पूजन करावे. * मंत्रोच्चारासहित कन्येस (तुळशीस) दान करावे. * यानंतर हवन व अग्नीभोवती सप्तपदी पूर्ण करावी. * नंतर वस्त्र व आभूषणे घालावित. * नंतर ब्राह्मण भोजन करवून मग स्वत: अन्न ग्रहण करावे. * शेवटी मंगलाष्टकांनी विवाह लावावा.