नागपूर पोलिसांनी मानवी तस्करीच्या टोळीतून 23 महिला आणि नऊ अल्पवयीन मुलांसह एकूण 38 कामगारांची सुटका केली. पोलिस आयुक्त रवींद्र कुमार सिंघल यांनी रविवारी ही माहिती दिली.
सिंघल म्हणाले की, हे कामगार मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील आहेत. त्यांना सोयाबीन कापणीचे काम देण्याचे आमिष दाखवून त्यांना सातारा येथे नेण्यात आले होते.
सिंघल म्हणाले की, एका स्वयंसेवी संस्थेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे, वाशिम जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक अनुज तारे यांच्याशी समन्वय साधून नागपूर पोलिसांनी मजुरांची सुटका केली. एजंटांनी पीडितांकडून 57,000 रुपये उकळले होते. सीताबर्डी पोलिस ठाण्यात तस्करी आणि खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.