त्यामुळे ताजी, टवटवीत फुले घरात ठेवावीत. दिवाणखान्यातील फुलदाणीत अशी फुले असावीत. पण ही फुले सुकल्यावर किंवा मरगळल्यावर मात्र तेथून काढून टाकावीत. त्यांच्या जागी ताजी, टवटवीत फुले ठेवली पाहिजेत. शेवटी ताजी, टवटवीत फुले हे जीवनाचे प्रतीक आहे, तर सुकलेली फुले हे मृत्यूचे. सुकलेली, मरगळलेली फुले 'यिन' ऊर्जा प्रवाहित करतात. ती घराला नैराश्याच्या आवर्तात ढकलते. म्हणूनच कितीही प्रिय व्यक्ती असली, तरी तिचे शव घरात ठेवले जात नाही. तसेच जी वस्तू मृत आहे किंवा यिन ऊर्जेचे प्रतीक आहे, ती घरात ठेवू नये.
फुलांची रोपे शयनगृहात न ठेवता, ती दिवाणखान्यात ठेवावीत. किचनमध्ये ठेवली तरी चालेल. आजारी व्यक्तीच्या शयनगृहात फुलांची रोपटी ठेवणे हे त्याला रोगातून बरे करण्यासाठी उपयुक्त ठरते. ताज्या फुलांऐवजी कृत्रिम फुले-म्हणजेच प्लॉस्टिकची किंवा मखमलीची, रेशमाची फुलेही ठेवली जातात. पण यासाठी विशेष प्रक्रियेद्वारे सुकवलेल्या नैसर्गिक फुलांचा उपयोग नको.