Article Film Preview Marathi %e0%a4%9a%e0%a4%b2%e0%a5%8b %e0%a4%a6%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%8d%e0%a4%b2%e0%a5%80 111042000006_1.htm

Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चलो दिल्ली!

चलो दिल्ली लारा दत्ता
बॅनर : भीगी बसंती एंटरटेनमेंट, बिग डॅडी प्रॉडकशन्स, इरोज इंटरनॅशनल ‍मीडिया लि.
निर्माता : कृषिका लुल्ला, लारा दत्ता, कविता भूपति चड्ढा
दिग्दर्शक : शशांत शा
संगीत : गौरव दास गुप्ता, आनंद राज आनंद, सचिन गुप्ता
कलाकार : ‍लारा दत्ता, विनय पाठक, अक्षय कुमार (पाहुणे कलाकार), याना गुप्त
रिलीज डेट : 29 एप्रिल 2011
PR

चलो दिल्ली एक रोड मूव्ही आहे. ह्या चित्रपटाची कथा दोन अशा प्रवासांची ज्यांचे मत, विचार, पोशाख आणि पेश्याने ते बिलकुल विपरीत आहे. मिहिका मुखर्जी (लारा दत्ता) आम महिलांपासून एकदम भिन्न आहे. मुंबई स्थित एका मल्टिनॅशनल कंपनीत ती सीनियर व्हाइस प्रेसिडेंट आहे. मिहिकाने आपले जग दोन भागात विभाजित विभक्त केले वाटून घेतले आहे, ज्यात एक आहे विनर्स आणि दुसऱ्यात लूजर्स. सर्व बाबतीत तिचे विचार एकदम स्पष्ट आहे, म्हणूनच तिला लोक मिसेस मिसेज क्लियर कट म्हणतात.

webdunia
PR

मिहिकाचा पती दिल्लीत काम करत असून तेथेच राहत असतो. त्याला भेटण्यासाठी म्हणून मिहिका मुंबईहून दिल्ली जाण्यासाठी निघते, पण तिची फ्लाईट मिस होते आणि तेथेच मिहिकाला मिळतो मनू गुप्ता (विनय पाठक). गोलमटोल, असभ्य असा त्याचा स्वभाव असतो. नेहमी स्वर चढवून बोलतो, मग भले ते थिएटरामध्ये सेलफोनवर बोलायचे असेल. पान किंवा गुटख्याची पीक इकडे-तिकडे थुंकतं बसतो, पण तो मूर्ख नसून फारच स्मार्ट असतो. दिल्लीत करोल बागमध्ये त्याची 10 बाय 10ची लेडीज कटपीसची दुकान आहे.

webdunia
PR

परिस्थिती अशी निर्माण होते की मिहिकाला मनू बरोबर दिल्ली जाण्यास भाग पडत. एक अशी यात्रा ज्यात रोमांच आहे, मस्ती आहे आणि थोडंसं मजाक देखील आहे. मिहिका महागड्या कपंनीच्या बाटलांचे पाणी पिते तर मनूला बोरवेलच्या पाण्यापासूनही काही समस्या नाही आहे. मिहिका धूम्रपानासाठी वर्जिना स्लिम्सचा प्रयोग करते तर तोच मनू गोपाल जर्दा चघळतो. दोघांमध्ये एकही गुण मिळत नसून ते मुंबई ते दिल्लीसाठी व्हाया जयपूर आपली यात्रा सुरू करतात.

webdunia
PR
PR

मिहिका आणि मनूची ही यात्रा दीड दिवसांत वाऱ्यात, सडक रस्ता व रेल्वेच्या माध्यमाने पूर्ण होते. या संपूर्ण यात्रेत त्यांना भारत दर्शन होतात. थकलेली मिहिका जेव्हा दिल्लीत पोहचते, तेव्हा तिच्याजवळ ह्या यात्रेबद्दल भविष्यात आपल्या नातवंडांना सांगण्यासाठी बरेच प्रसंग तयार होतात. या संपूर्ण कथेचा एकच सार निघतो की माणसाच्या चेहऱ्यावरून कुठलेही मत कायम करू नये.

Share this Story:

वेबदुनिया वर वाचा

मराठी ज्योतिष लाईफस्टाईल बॉलीवूड मराठी बातम्या

Follow Webdunia marathi