हर्ष कामात खुपच व्यस्त असतो आणि लग्नापूर्वी तो आपली सगळी कामे आटोपती घेतो. घरच्यांना मॉरीशस दाखविण्याची जबाबदारी तो आलियाला देतो. पण, आलीयावर नाराज असल्याने आई सिद्धार्थबरोबर फिरत असते. हर्ष आपणाकडे दुर्लक्ष करत असल्याचे आलियाला वाटू लागते. आणि ती सिद्धार्थकडे आकर्षित होते. सिद्धार्थही तिच्याकडे आकर्षित होतो पण, तो आपणावर आवर घालण्याचा प्रयत्न करतो.
आलिया जवळीक वाढवते तेव्हा सिद्धार्थही तिच्या प्रेमात पडतो. सिद्धार्थची आईला याबाबत संशय येतो. आणि हे सर्वांना कळते तेव्हा माथुर कुटूंबात वादळ येते. चित्रपट रोमांस आणि कॉमेडीने भरपूर आहे. चित्रपटात असे अनेक क्षण आहेत ज्यावेळी पोटधरून हसू येते आणि काहीवेळा डोळ्यातून पाणीही येते.