फळांचा राजा तर याच काळात मोहरतो, फळतो अन् आपल्या रसाळ गोमट्या फळांनी लहान थोरांची, गरीब-श्रीमंताची रसना तृप्त करायला तयार होत असतो. सगळीकडे उत्तमोत्तम गोष्टींची पखरण करणारा हा वसंत म्हणजे एखाद्या राजाच आहे (ऋतूंचा राजाच म्हणाना !) राजाच तो, त्याला कशाची कमतरता, सगळ अगदी व्यवस्थित, साग्रसंगीत व आपल्या उच्च अभिरुचीनुसार तो घडवतो जसे मोगर्याचा सुगंध, आंब्याची डाळ, पन्हे, वाळ्याचे पडदे हा सारा थाट, ही व्यवस्था त्याच्या आगमनाचीच. असतात. मंगळागौर, डोहाळजेवण, हळदीकुंकू यासारखे (बायकी!) सण म्हणजे त्यांच्यातील सृजनाला आवतण. गौर सजवणे, वेगवेगळ्या रांगोळ्या, कला कुसरीच्या वस्तू, पाकक्रियेतली निपुणता हयात त्या हळूहळू पारंगत होत असाव्यात. हल्ली या प्रकारचे समारंभ आपल्याला वेळानुसार, सवडीनुसार का होईना पण होतातच आणि त्यातून सर्वजण आनंदही मिळवतात कारण आजच्या धकाधकीच्या आयुष्यातही प्रत्येकीला मोकळे होण्यासाठी अशी संधी मिळणे गरजेचेच आहे.
याच महिन्यात 'बालचंद्रमा व्रत' करतात म्हणजे सूर्यास्ताला अंघोळ करून आकाशातल्या चंद्राची किंवा तांदळा पासून चंद्र तयार करून त्याची पूजा करायची. (बालचंद्रमसे नम:) प्रत्येक महिन्याच्या चंद्रदर्शना दिवशी ह्या प्रमाणे करावे वर्षभर हे व्रत करतात व ह्या दिवशी तळलेले पदार्थ खात नाहीत.