Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चांदीमुळे जीवनात येणार्‍या सुख आणि संपन्नतेबद्दल जाणून घ्या

चांदीमुळे जीवनात येणार्‍या सुख आणि संपन्नतेबद्दल जाणून घ्या
हिंदू धर्मात चांदीला फारच शुद्ध आणि प्रभावशाली धातु मानले गेले आहे. चांदीचा वापर बर्‍याच रुपात होतो आणि हा प्रत्येक प्रयोगात फायदेशीर ठरतो. अशी मान्यता आहे की चांदीचे दागिने, नाणे , मुरत्या आणि भांडी ज्या घरात असतात तेथे सुख, वैभव आणि संपन्नता येते. पुढच्या पानावर बघा चांदी एवढी महत्त्वपूर्ण का -
 
1. असे मानले जाते की चांदीची उत्पत्ती महादेवाच्या नेत्राने झाली होती.  
 
2. ज्योतिष्यामध्ये चांदीचा संबंध चंद्रमा आणि शुक्राशी आहे. चांदी शरीरातील जल तत्त्व आणि कफाला नियंत्रित करते.  
 
3. चांदीच्या प्रयोगामुळे मन मजबूत आणि मस्तिष्क तेज होत. तसेच चांदीच्या प्रयोगामुळे चंद्राच्या सर्व समस्या शांत होण्यास मदत मिळते.
webdunia
4. चांदीच्या ग्लासात पाणी प्यायल्याने सर्दी खोकल्याची समस्या दूर होते तसेच चांदीच्या चमच्याने मध खाल्ल्याने शरीर विषमुक्त होत.  
 
5. ज्या लोकांना भावनात्मक त्रास जास्त असतील त्यांनी चांदीचा वापर फार सावधगिरीने करावा.  
 
6. कर्क, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांनी चांदीचा वापर केला तर त्याचे चांगले परिणाम मिळतात तसेच मेष, सिंह आणि धनू राशीच्या लोकांसाठी चांदी उत्तम नसते.  

Share this Story:

Follow Webdunia marathi