हिंदू धर्मात शास्त्रानुसार अंघोळ करणं हा देखील एक विधी मानला गेला आहे. ब्राह्म मुहुर्तावर म्हणजेच पहाटे स्नान करणं हे
शुभ असल्याचं म्हटलं जातं. त्याला ब्राह्म स्नान म्हणतात.
यावेळी अंघोळ करताना देवाचं नामस्मरण करण्यास सांगितलं आहे. असं करणार्या व्यक्तींवर त्यांच्या कुलदेवतेची कृपा होते.
ब्राह्म मुहुर्तावर स्नान करताना सूर्याला अर्घ्य देण्याची पद्धत आहे. त्यामुळे गुणगौरव होतो.
सकाळी ६ च्या सुमारास दिवस उजाडताना जे स्नान केलं जातं, त्याला ऋषी स्नान म्हटलं जातं. सकाळी सूर्योदयानंतर स्नान करताना भारतातील काही पवित्र नद्यांची नावं घेण्याची पद्धत आहे. या स्नानाला देवस्नान म्हणातात. पूर्वी हे स्नान नदीवर केलं जाई. हे स्नान जीवनातील विवंचना दूर करणारं मानलं जातं.