विषयानंदाचा त्याग केला की ब्रम्हानंदाचा अनुभव येतो
गोपींना उपदेश करण्याकरता गेलेल्या उद्धवाला त्या म्हणाल्यात ''अरे, उद्धवा, सहा शास्त्र, चार वेद यांचा अभ्यास करून तू कोराच्या कोराच राहिलास रे. तुझा श्रीकृष्ण काय फक्त मथुरेतच असतो? आमचा श्रीकृष्ण तर झाडांच्या पानापानांत बसला आहे. आमच्या देहाच्या रोमा रोमात त्याचा वास आहे. मग मथुरेतील कृष्णाची आम्हाला काय पर्वा? उद्धवा लाकळले की आजपर्यंत आपर केवळ अव्दैताचे धडेच घेत होतो पाठांतरच कारीत होतो पण या गोपींनी मात्र अव्दैताचा अभ्यास न करताही जीवनात अव्दैताचा अनुभव घेतला आहे. गोपींना वंदन करून उद्धव म्हणाला हे बायानो ''माझ्यावरही कृपा करा व माझे हृदयही कृष्णप्रेमाने ओले करा.''
परमेश्वरावरील प्रेमाशिवाय ज्ञान ध्यान सार व्यर्थ आहे. ज्ञानाने निवृत्ती होते. पण ईश्वरप्रेमाने भगवंताची प्राप्ती होते. ईश्वर प्राप्ती हेच तर अध्याम्त्याचे फल आहे हे जर प्राप्त होत नसेल तर ज्ञान आणि भक्तीचा काय फायदा?
(श्रीमदभागवत या महान ग्रंथाचे सार सांगणाऱ्या परमपूज्य डोंगरे महाराजकृत भागवत प्रसादी या पुस्तकाचा भावानुवाद)
अनुवादकः सौ. कमल जोशी