कंटकेनेव कंटकम
भगवान कपिलदेवाने आपल्या आईला म्हटले की ''आई देवहुति हे जग खराब नाही पण हे जग पाहणारे आपले मन खराब आहे.''
आपले मन आपण सुधारले की जगातील कोणतेही दोष आपल्याला दिसणार नाही. लौकिक वासनेत फसलेले मन काढून ते जर आपण अलौकिक वासने मध्ये बसविले तर ते सुधारण्यास वेळ लागणार नाही. संसारात रमलेली वासना लौकिक वासना तर ईश्वर प्राप्तीची वासना म्हणजे अलौकिक वासना. ईश्वरप्राप्तीची इच्छा झाली की आपली संसारातील इच्छा नष्ट होते. म्हणून लौकिक वासनेचा काटा अलौकिक वासनेने काढून टाकावा. आपले मन ईश्वरप्रेमाने भरून टाकले की संसारिक वासना आपोआप नाहीशी होते.
(श्रीमदभागवत या महान ग्रंथाचे सार सांगणाऱ्या परमपूज्य डोंगरे महाराजकृत भागवत प्रसादी या पुस्तकाचा भावानुवाद)
अनुवादकः सौ. कमल जोशी