ज्याजे जीवन दिव्य, तो मृत्यू नंतर देवता बनतो
धूर्ततेवर इलाज:-मन खूप चलाख आहे ते मानवाला ममता आणि अंहकाराच्या साहाय्याने कुमार्ग दाखवते मनाची ही चलाखी दूर करण्याकरता अध्यात्मात दोन मार्ग सांगितले आहेत. एक ज्ञानमार्ग व दुसरा भक्तिमार्ग ज्ञानमार्ग म्हणतो:- सर्वस्वाचा त्याग कर कुणावरही प्रेम करू नकोस सर्व दृष्य विषयांकडे अपेक्षारहित दृष्टीने पहा. भक्तीमार्ग म्हणतो अर्ध्या रात्री जरी कुणी अनोळखी गरीब व्यक्ती आपल्या घरी आली तरी तिच्यात परमात्म्याचे रूप पहा. त्या व्यक्तीचे प्रेमपूर्वक स्वागत करा व त्याला प्रेमाने जेवू घाला. असे केल्यानेच अहंकार आणि ममतेची धूर्तता नाहीशी होईल.(
श्रीमदभागवत या महान ग्रंथाचे सार सांगणाऱ्या परमपूज्य डोंगरे महाराजकृत भागवत प्रसादी या पुस्तकाचा भावानुवाद)अनुवादकः सौ. कमल जोशीवासना पुनर्जन्माला कारण आहे