Publish Date: Tue, 15 Sep 2015 (11:53 IST)
Updated Date: Tue, 15 Sep 2015 (11:54 IST)
तुमचे जीवन हे एखाद्या भेटवस्तूसारखे आहे आणि तुम्ही त्या भेटवस्तूचे वेष्टण काढण्यासाठी आलेले आहात. वेष्टण काढण्याच्या प्रक्रियेत, वेष्टणाचा कागदही जपण्याचे लक्षात ठेवा. तुमच्या भोवतालचे वातावरण, तुमच्या भोवतालची परिस्थिती ज्यात तुम्ही आणि तुमचे शरीर वेष्टणाचा कागद आहात. जेव्हा आपण कागद बाजूला करतो तेव्हा आपण तो नष्ट करून टाकतो. आपण इतके घाईत असतो की बरेचदा आपण भेटवस्तूही नष्ट करतो. चिकाटीने आणि सहनशक्तीने तुमच्या भेटवस्तू उघडा आणि वेष्टणाचा कागदही जपून ठेवा.
श्री श्री रविशंकर ‘मौन एक उत्सव’ मधून साभार