Publish Date: Wed, 13 Aug 2014 (15:57 IST)
Updated Date: Wed, 13 Aug 2014 (16:00 IST)
15 ऑगस्टला म्हणजेच 'स्वातंत्र्य दिनाच्या मागील-पुढील दिवसांच्या सुट्यांची गोळाबेरीज करून ध्वजारोहणाला दांडी मारणार्या सरकारी कर्मचार्यांना मोदी सरकारने सज्जड इशारा दिला आहे. यामुळे ध्वजारोहणाला गैरहजर राहारार्या कर्मचार्यांवर कारवाई होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
स्वतंत्र्यदिनी झेंडावंदनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहाणे अधिकार्यांचे कर्तव्यच आहे, याची जाणीव त्यांनी ठेवावी, असे कॅबिनेट सचिव अजित सेठ यांनी पत्रात नमूद केले आहे. ध्वजारोहण समारंभातील गैरहजेरी गांभीर्याने घेतली जाईल, असे स्पष्ट संकेत यातून देण्यात आले आहे.