Publish Date: Tue, 14 Feb 2023 (13:10 IST)
Updated Date: Tue, 14 Feb 2023 (13:46 IST)
शिवाजींचे वडील शहाजी विजापूरचे सुलतानच्या दरबारात सामंत (सरदार) असत. त्यांना अनेकदा युद्धासाठी घरापासून दूर जावे लागत असत. शिवबा हे निर्भीड आणि सामर्थ्यवान असल्याची त्यांना जाणीव नसे.
एकदा त्याने शिवाजींना आपल्या सोबत विजापूरच्या सुलतानाच्या दरबारात नेले. शहाजीने सुल्तानास 3 वेळा वाकून अभिवादन केले आणि असे करण्यास शिवाजींनाही सांगितले. शिवाजींनी असे करण्यास नकार दिला आणि ताठ मानेने उभे राहिले.
त्यांनी कुठल्याही परिस्थितीत परदेशी शासक समोर मान झुकविण्यासाठी नकार दिला आणि एखाद्या सिंहाप्रमाणे ताठ मन करून दरबारातून निघून गेले. कोणासही शिवाजींच्या अश्या निर्भिडपणाची अपेक्षा नव्हती. हाच निर्भीड बालक एका कुशल आणि प्रबुद्ध राज्याचे राजे झाले. आज यांना आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखतो.