पाकिस्तानातील दहशतवादाला भारताची चिथावणी असून दहशतवादाचा पाकिस्तानच बळी ठरला आहे, अशा उलट्याबोंबा पाकचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी केल्या आहे.
संयुक्त राष्ट्रात शरीफ यांनी काश्मिरचा मुद्दा करीत चार सुत्री कार्यक्रमाचा प्रस्ताव दिला होता. मात्र, तो धुडकावून लागवत भारताने त्यांना चोख प्रत्युत्तर दिले होते. पाकिस्तानने सुरुवातीस दहशतवाद थांबावावा आणि मग काश्मिरप्रश्नी बोलावे असा आहेर भारताच्या परराष्ट्रमंत्री सुरषा स्वराज्य यांनी दिला होता. या पार्श्वभूमीवर शरीफ यांनी पुन्हा वाचाळ बडबड केली आहे. भारताकडूनच दहशतवादाला खतपाणी घातले जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.