Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारत- पाकचे पुन्हा ‘तुझ्या गळा, माझ्या गळा’

भारत- पाकचे पुन्हा ‘तुझ्या गळा, माझ्या गळा’
इस्लामाबाद , गुरूवार, 10 डिसेंबर 2015 (10:29 IST)
परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांच्या पाकिस्तान दौर्‍यामध्ये दोन्ही देशांनी पुन्हा ‘तुझ्या गळा, माझ्या गळा’चा सूर आळवला आहे.
 
पाकिस्तानकडे आज मैत्रीचा हात पुढे करत दहशतवाद मुळापासून उखडून टाकण्यासाठी दोन्ही देशांसाठी एकमेकांसोबत काम करण्याची वेळ येऊन ठेपली आहे, अशी अपेक्षा स्वराज यांनी व्यक्त केली.
 
हार्ट ऑफ एशिया संमेलनात बोलताना स्वराज म्हणाल्या की, दहशतवादी कारवायांना कुठल्याही स्वरूपात आश्रय देण्यात येऊ नये. त्यासाठी भारताने पाकिस्तानला विकासासाठी सहकार्य करण्याचा प्रस्ताव दिला. पाकिस्तानसोबत विकासाच्या वाटेवर पुढे जाण्यासाठी किंबहुना त्यांना सहकार्य करण्यासाठी आमची तयारी तर आहेच; पण तूर्तास अफगाणिस्तानच्या मदतीचा संकल्पही करण्याची गरज आहे.
दरम्यान, भारत आणि पाकिस्तान परस्पर संबंध सुधारण्यासाठी प्रयत्न करीत असल्याच्या पार्श्वभूमीवर परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी बुधवारी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची येथे भेट घेतली.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi