Publish Date: Fri, 09 May 2025 (10:57 IST)
Updated Date: Fri, 09 May 2025 (11:01 IST)
भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानवर निशाणा साधला आहे. काश्मीरमध्ये जे घडले ते भयानक होते असे अमेरिकेने म्हटले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये लष्करी चकमकी सुरू झाल्या आहे.
गुरुवारी रात्री पाकिस्तानने अनेक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने भारतावर हल्ला केला. भारताने पाकिस्तानचे सर्व ड्रोन आणि क्षेपणास्त्रे पाडली आहे. आता भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावावर अमेरिकेचीही प्रतिक्रिया आली आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या प्रवक्त्या टॅमी ब्रूस यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर पाकिस्तानवर निशाणा साधला आहे.
तसेच शांतता नाही तर संवादाची गरज आहे आणि गेल्या दोन दिवसांत दोन्ही देशांमधील विविध नेत्यांशी झालेल्या संभाषणात अमेरिकेने या मुद्द्यावर लक्ष केंद्रित केले आहे."
Edited By- Dhanashri Naik