Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारताने केली सीमा पार मारले आतंकवादी - लेफ्टनंट जनरल

भारताने केली सीमा पार मारले आतंकवादी - लेफ्टनंट जनरल
, गुरूवार, 29 सप्टेंबर 2016 (13:52 IST)
जम्मू काश्मीर येथील उरी बेस वर केलेल्या  हल्ल्यानंतर आक्रमक झालेल्या भारताने थेट पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ला केला  आहे. यामध्ये भारतीय जवानांनी दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केला असून अनेक अतिरेक्यांचा खात्मा केला, अशी माहिती आज महासंचालक (लष्करी कारवाई) डीजीएमओ लेफ्टनंट जनरल रणबीर सिंह यांनी दिली.

भारतीय सीमा रेषा पार करत काही लष्करी आणि आतंकवादी येणार आहे असे भारतीय लष्कराला समजले होते. तेव्हा त्यांना भारतात घुसू न देता त्यांना भारतीय लष्कराने पाकीस्थानात घुसून मारले आहे. तर भारतीय लष्कर कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यास सज्ज असल्याचंही रणबीर सिंह यांनी ठणकावून सांगितलं.त्यामुळे भारताचा हे रूप पाहून पाकिस्थान नक्कीच विचारात पडले असणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तिचा थ्रील' रपणा आणि घडले उरण ऑपरेशन