Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वंचित आघाडीमुळेच काँग्रेसचे नुकसान

वंचित आघाडीमुळेच काँग्रेसचे नुकसान
, शनिवार, 25 मे 2019 (17:21 IST)
लोकसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठाफटका बसला आहे. मात्र अनेक ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांनी घेतलेल्या लाख-दिड लाख मतांनी आघाडीला नुकसान झालं तर भाजपा-शिवसेना युतीला फायदा झाल्याचं दिसलं. वंचित बहुजन आघाडी ही भाजपाची बी टीम आहे. त्यांच्या फायद्यासाठी त्यांनी उमेदवार उभे केले, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे. तर वंचित आघाडीमुळेच काँग्रेसचं नुकसान झाल्याचा थेट आरोपदेखील अशोक चव्हाण यांनी केला.
 
लोकसभेतील दारुण पराभवानंतर काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरू झाले असून माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनीही राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. देशात जिथं-जिथं काँग्रेसला अपयश आलंय, तेथील सर्व प्रदेशाध्यक्षांनी राजीनामे द्यावेत, असं मतही त्यांनी मांडलं आहे 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बुद्धिबळाचे खेळाडू अमित शहा यांची कमाल, जाणून घ्या त्यांच्या यशाबद्दल 5 गोष्टी