Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भाजप स्वबळावर 292 जागांवर आघाडीवर

भाजप स्वबळावर 292 जागांवर आघाडीवर
, गुरूवार, 23 मे 2019 (13:42 IST)
हमीरपुर हून भाजपचे अनुराग ठाकुर विजयी
बिहारच्या दरभंगा येथून भाजपचे गोपालजी ठाकुर विजयी
राजस्थानच्या भीलवाडा येथून भाजपचे सुभाषा बहेडिया विजयी
बिहारच्या वाल्मीकि नगरहून जेडीयूचे वैद्यनाथ प्रसाद विजयी
निवडणूक आयोगानुसार भाजप स्वबळावर 292 जागांवर आघाडीवर
 
प्रियंका गांधी वाड्रा यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली
पटना साहिब जागेहून रविशंकर प्रसाद आघाडीवर, काँग्रेसच्या शत्रुघ्न सिन्हा पिछाडीवर
खंडवाहून भाजप उमेदवार नंदकुमार सिंह चौहान आघाडीवर, काँग्रेसच्या अरुण यादव यांची पराजय निश्चित

लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. आज अनेक दिग्गज नेत्यांचे भवितव्य ठरणार आहे. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.
 
विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली. लोकसभेला भाजप 25 आणि शिवसेना 23 मतदारसंघांमधून लढली. तर विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष निम्म्या-निम्म्या जागा लढवणार आहेत अशी घोषणा करण्यात आली.
 
इकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने क्रमश: 26 आणि 22 मतदारसंघांमधून आपले उमेदवार उभे केले होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अमेठीत अजूनही स्मृती इराणीच पुढे तर वायनाडमधून राहुल गांधींना ‘मोठी’ आघाडी