पहिले आरएसएस ची गरज होती, आता भाजप स्वतः सक्षम- जेपी नड्डा यांचा जबाब
Publish Date: Mon, 20 May 2024 (10:06 IST)
Updated Date: Mon, 20 May 2024 (10:10 IST)
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे म्हणाले की, पहिले आम्हाला आरएसएस ची गरज होती. पण आता पक्ष सक्षम आहे. आज पक्ष स्वतः चालत आहे. जेपी नड्डा म्हणाले की, कशी-मथुरामध्ये मंदिर बनवण्यासाठी आजून प्लॅन नाही.
तसेच जेपी नड्डा म्हणाले की, सुरवातीला आम्ही अक्षम होतो. तेव्हा आरएसएसची गरज पडत होती. आज आमची संख्या वाढली आहे, आम्ही सक्षम आहोत. भाजप स्वतःच स्वतःला चालवते. हेच अंतर आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्णय केला आहे की, पक्षाचे लक्ष गरीब, शोषित, दलित, महिला, तरुण, शेतकरी, समाज यानावर राहील. यांना मुख्यधारा मध्ये आणायला पाहिजे. तसेच सशक्त बनवायला हवे. आमहाला त्यांना मजबूत करायला लागेल.
भाजपने राम मंदिराच्या मागणीला आपल्या पालमपूर संकल्प मध्ये सहभागी केले होते. मोठ्या संघर्षानंतर मंदिर उभे राहिले. आमची पार्टी मोठी आहे आणि प्रत्येक नेत्यांची बोलण्याची एक शैली आहे.
पुढील लेख