Publish Date: Fri, 17 May 2024 (20:32 IST)
Updated Date: Fri, 17 May 2024 (20:35 IST)
सध्या देशात लोकसभा निवडणुकीसाठी 4 टप्प्यात मतदान झाले असून आता पाचव्या टप्प्याचे 20 मे रोजी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळी सुरु असून सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्यांना आता पर्यंतच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची स्थिती वर बोलताना ते म्हणाले, मी जिथे आहे तिथे मला लोकांचे प्रेम मिळत आहे.
देशद्रोहांना महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही. बाळासाहेब ठाकरेंनी बांधलेला पक्ष फोडून चोरणाऱ्यांना महाराष्ट्र कधीच माफ करणार नाही. लोकांमध्ये संताप आणि नाराजी असल्याची भावना लोकांमध्ये दिसून येत आहे. असं म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.उद्धव ठाकरे यांना देवेंद्र फडणवीस यांच्याशी संबंधित प्रश्न विचारला असता. ते म्हणाले माझा लढा देवेंद्रशी नाही तर दिल्लीत बसलेल्या हुकूमशाहीशी आहे.
देवेंद्र निश्चितपणे आधी मुख्यमंत्री होते. मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांनी मी परत येईन असा नारा दिला. आणि ते आले पण शिपाई म्हणून
माझ्यामुळेच ते 15 वर्षे सत्तेत होते. भाजपसोबत युतीच्या प्रश्नावर उद्धव म्हणाले की, मी कोणत्याही हुकूमशहाचे समर्थन करणार नाही. त्यांनी मला आणि शिवसेनेला संपवण्याचा प्रयत्न केला. मी त्यांच्याबरोबर जाऊ शकतो का? ही निवडणूक माझ्यासाठी नाही तर भाजपसाठी करा किंवा मरोची आहे.
ते हिंदू-मुस्लिम करतात. त्यांनी मुस्लिमांची भीती दाखवली आहे. पण आम्ही मुस्लिमांना सोबत घेतो.
आमची फसवणूक झाली आहे लोकांची फसवणूक झाली आहे.आम्हीच खरी शिवसेना आहोत. खरी शिवसेना कोणती हे पंतप्रधानांनी त्यांच्या मनाला विचारावे, त्यांना उत्तर मिळेल. भविष्यात पुन्हा महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होण्याच्या प्रश्नावर उद्धव म्हणाले की, मी मुख्यमंत्री होण्याची स्वप्ने पाहणारा नाही.
मी जेव्हा माझ्या कारकिर्दीला सुरुवात केली तेव्हा लोक म्हणायचे की मला भाषण कसे करावे हे देखील कळत नाही. मला भाषण कसं करायचं हे कळत नाही हे मी मान्य केलं होतं. मी मनातून बोलत नाही, मनापासून बोलतो. मन विचार करते, हृदय विचार करत नाही. सद्यस्थितीत आपल्याला भारतमातेला हुकूमशाही आणि भाषणबाजीपासून वाचवायचे आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान मोदींवर टोला लगावला आहे.