Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आंधळी कोशिंबीरचे कथानक

आंधळी कोशिंबीरचे कथानक

वेबदुनिया

PR
शब्दप्रधान विनोदनिर्मिती असलेला कौटुंबिक चित्रपट हे मराठी चित्रपटाचे बलस्थान आहे. नात्यांमधील घट्ट वीण, आपापसातील वाद-विवाद व त्यातून निर्माण होणारा विनोद यामुळे मराठी चित्रपट निखळ मनोरंजन करतो. सुधा प्रॉडक्शन या संस्थेची निर्मिती असलेल्या आगामी आंधळी कोशिंबीर या चित्रपटातून रसिकांना अशाच मनोरंजनाची मेजवानी चाखायला मिळणार आहे. अनुया म्हैसकर यांच्या सुधा प्रॉडक्शनतर्फे निर्मित आंधळी कोशिंबीर या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य इंगळे करत आहेत. सध्या पुणे परिसरामध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू आहे. याविषयी बोलताना दिग्दर्शक आदित्य इंगळे म्हणाले, ‘सध्या समाजामध्ये अनेक नातेसंबंधांमध्ये वेगवेगळे दृष्टिकोन असतात. त्यामुळे त्यांच्यामधील नातेसंबंध विकसित होत असताना त्यांच्या जाणिवा, विचार बदलत असतात. जेव्हा असे चार वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र येऊन एक कुटुंब बनते तेव्हा एकच गोंधळ उडतो. अशा गोंधळातून चांगला विनोद निर्माण होतो.

या चित्रपटांमधून तीन पिढय़ांमधील कलाकार एकत्र येत आहेत. तसेच बर्‍याच वर्षानंतर अशोक सराफ यांच्या प्रमुख भूमिकेचा आस्वाद या चित्रपटामधून रसिकांना घेता येणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi