Publish Date: Sat, 23 Nov 2024 (15:41 IST)
Updated Date: Sat, 23 Nov 2024 (15:47 IST)
Who will be Maharashtra's next CM महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालात सत्ताधारी महायुती आघाडी ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करताना दिसत आहे. मतमोजणी अद्याप पूर्ण झालेली नाही, मात्र दुपारी 3 वाजेपर्यंतच्या ट्रेंडनुसार महायुती 220 हून अधिक जागांवर आघाडीवर आहे. महायुतीमध्ये भाजप 129 जागांसह आघाडीवर आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना 55 जागांसह दुसऱ्या तर अजित पवारांची राष्ट्रवादी 40 जागांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
महाराष्ट्रातील विजयाच्या पार्श्वभूमीवर भाजपने मित्रपक्षांसोबत विचारमंथन सुरू केले आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्रीपदाची शर्यत सुरू झाली आहे. काही वेळापूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्याशी तर काही वेळानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी अजित पवार यांच्याशी संवाद साधला.
भाजप आपल्या सहकारी पक्षांची मने तपासण्यात व्यस्त आहे. आपला दणदणीत विजय पाहता भाजपने देवेंद्र फडणवीस यांना पुढे करून सत्तेत येण्याची तयारी सुरू केल्याचे मानले जात आहे. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याचे भाजपने ठरवले असून, त्यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी महायुतीतील साथीदारांशी बोलणी सुरू केली आहेत.
अमित शहा यांनी अजित पवारांशी चर्चा केली
मतमोजणीदरम्यान राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याशी 25 मिनिटे चर्चा केली. या संवादापूर्वी अजित पवार यांच्या पत्नी आणि राज्यसभा खासदार सुनेत्रा पवार यांचे वक्तव्यही समोर आले होते. महाराष्ट्र, राष्ट्रवादी काँग्रेस आणि बारामतीच्या जनतेसाठी हा भाग्याचा दिवस असल्याचं सुनेत्रा पवार म्हणाल्या होत्या. अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावेत हीच महाराष्ट्रातील जनतेची इच्छा आहे, असेही त्या म्हणाल्या.
तीनही पक्ष मिळून मुख्यमंत्री चेहरा ठरवतील
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या बाजूनेही वक्तव्ये सुरू झाली आहेत. निवडणुकीपूर्वी ज्याच्या जास्त जागा असतील तोच मुख्यमंत्री होणार हे ठरले होते, यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, 'ज्याकडे जास्त जागा तोच मुख्यमंत्री होणार हे ठरले नव्हते.
फडणवीस काय म्हणाले?
महायुतीतील सर्व पक्ष बसून चर्चा करतील, त्यानंतर मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित होईल. महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होणार या प्रश्नावर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मुख्यमंत्र्यांच्या चेहऱ्यावर कोणताही वाद होणार नाही, हे पहिल्या दिवसापासूनच ठरले होते निवडणुकीनंतर यावर तिन्ही पक्षांचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील, जो निर्णय सर्वांना मान्य असेल, त्यावर कोणताही वाद नाही.